पुरातत्व विभागाकडून चिंचवण नगरीचा पुरातन हेमाडपंती मंदिराचा ठेवा दुर्लक्षितच...

पूर्वी मंदिर बारव व त्याचबरोबर विविध प्रकारच्या मंदिराचा जीर्णोद्धार हे चिरेबंदी बांधकामाने बांधलेली असायची त्याच्या अनुषंगाने पुरातन काळातील मंदिर हे अतिशय खूप मोठ्या रेखीव दगडाने बांधलेले आहेत असाच ठेवा हा कायम ठेवण्यासाठी मात्र पुरातन मंदिर पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित झालेले आहे. याबाबत पुराततत्त्व विभागाने तात्काळ लक्ष घालून पुरातन हेमाडपंती असलेले मंदिर पुनश्च त्यांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न केले तर खरोखरच पुरातन इतिहास हा कायम राहील.

राज्यात पुरातन काळापासूनच हेमाडपंती मंदिर बांधलेले आहेत, परंतु आज मितीला पाहिलं तर मंदिराकडे मनाप्रमाणे पाहिले जात नाही. अशाचप्रकारे बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुक्यात चिंचवण या गावांमध्ये इतिहास कालीन अतिशय पुरातन हेमाडपंती मंदिर बांधले आहे. परंतु आज पाहिलं तर पुरातत्व विभागाकडून या मंदिराला जतन करण्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत. वेळोवेळी हे मंदिर पडझडीला आलेले आहे. परंतु याकडे मात्र पुरातत्व विभाग मात्र कानाडोळा करताना दिसत आहे. चिंचवण नगरीमध्ये इतिहासतील पुरातन कालीन व हेमाडपंती विठ्ठल रुक्मिणी, महादेवाचे मंदिर त्याचबरोबर मंकावती हे देखील मंदिर आहे. या मंदिराकडे मात्र पुरातत्त्व विभाग मात्र कुठल्याही प्रकारचे लक्ष देताना पाहिले नाही त्याचबरोबर गेल्या ६० ते ७० वर्षांपासून या मंदिराचा डागडुजीचा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ मिळून करत आहेत. परंतु शासन प्रशासन आणि पुरातत्व विभाग याकडे मात्र कानाडोळा करताना दिसत आहे. आपण पाहिलं तर बीड जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात पुरातन ठेवा लाभलेला आहे, पुरातन मंदिरही लाभले आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, परंतु चीन सारख्या या गावातील मंदिरांना मात्र शासनाकडून कुठल्याही प्रकारचे डागडुजी करण्यासाठी मदत मिळताना पाहिले नाही. याठिकाणी मकरध्वज देशातील दोन ठिकाणी असलेले मंदिर आहे. या मंदिराला देखील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासन-प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे परंतु या मागणीला जाणून-बुजून फाटा दिला जात आहे. त्यामुळे आगामी काळात जर का या मंदिरांना चांगल्याप्रकारे रंगरंगोटी केली नाही तर पावसाच्या पाण्यामुळे यामध्ये मंदिरांचा इतिहासकालीन व पुरातन हेमाडपंती ठेवा असलेला नामशेष होण्याच्या मार्गस्त आहे. 

त्यामुळे मकरध्वज मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महादेवाचे मंदिर या मंदिरांना पुरातत्व विभागाकडून अत्यावश्यक असलेला निधी मिळाला तर या मंदिरांना चांगले प्रकारचे जीवदान मिळेल. पुरातन कालीन ठेवा असलेला तो जपण्यास पुरातत्व विभाग लक्ष घालेल का? आता प्रश्न चिंचवण ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. विठ्ठल रुक्मिणी व महादेवाच्या मंदिर हे अतिशय पुरातन व हेमाडपंती शिवकालीन असून या मंदिराची खूप मोठ्या प्रमाणात आता पडझड झाली असून पुरातन कालीन मंदिराकडे आता पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची मागणी चिंचवण ग्रामस्थांच्या माध्यमातून होत आहे. या पुरातन व हेमाडपंती मंदिरातून अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भुयारी मार्ग देखील आहे हा भुयारी मार्ग धारुरचा किल्ला मार्गस्थ करून आंबेजोगाई येथील  हाती खाण्यामध्ये निघत आहे. पूर्वीचे लोक हे त्याच मार्गाने धारूर आंबेजोगाई असा भुयारी मार्गाने प्रवास करायचे याठिकाणी कुंडलिका नदीमध्ये रामठव त्याची ठिकाणी प्रभू राम जात असताना त्यांनी या ठिकाणी आंघोळ केली असल्यामुळे गावाचे नाव रामठव असे पडले असे लोक सांगतात. चिंचवण नगरीचे नाव हे पूर्वी मंकावती नगरी असे होते, परंतु कालांतराने चिंचवण असे झाले या ठिकाणी असलेले शिवकालीन शिवमंदिर हे अप्रतिम नक्षीकाम असलेले मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार हा पुरातन लोकांनी केला असे म्हटले जाते. मंदिराचे काम हे सर्व दगडाच्या नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराच्या प्रत्येक दगडावर हे पुरातनकालीन चित्रदेखील रेखाटलेली आहेत. 

हे मंदिर हे अतिशय पुरातन काळातील असून या मंदिराला आता शासनाकडून आधार मिळेल का? असेच बोलले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून व प्रत्येक विभागाकडून वेळोवेळी पुरातनकालीन व हेमाडपंती मंदिरांना खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. परंतु या मंदिराकडे मात्र पुरातत्त्व विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे असे म्हटले जात आहे. या ठिकाणी मकरध्वज असलेले मंदिर हे अतिशय पुरातन कालीन होते परंतु सर्व ग्रामस्थांनी मिळून या मंदिराला उभारण्यासाठी ४० लक्ष रुपये ग्रामस्थाच्या माध्यमातून वर्गणी जमा करून या मंदिराचा कळस उभारण्यात आला आहे. वेळोवेळी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की, मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा परंतु या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केलेले आहे. राजा मकरध्वजाचे मंदिर देशामध्ये दोन ठिकाणी एक काशीमध्ये आणि एक बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवण या गावामध्ये असून  गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर मात्र पुरातत्त्व विभाग व शासन प्रशासनाकडून लक्ष देत आहे परंतु आता पुरातत्त्व विभाग व शासनाने येथील हेमाडपंती असलेले महादेवाचे मंदिर विठ्ठल रुक्माईचे मंदिर, मंकावती मंदिर, व हेमाडपंती मंदिर आहेत. शासनाकडून पुरातत्व विभागापासून दुर्लक्षित आहे त्यामुळे आगामी काळात पुरातत्त्व विभाग व शासनाने या हेमाडपंती मंदिरांना निधी उपलब्ध करून दिला तर पुरातन कालीन व इतिहास कालीन असलेला हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा कायम राहील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राजकीय नेतृत्वाने गावाचा सत्यानाश केला...!
गावातील राजकीय नेतृत्त्वामुळे गावाला दुर्लक्षित राहावे लागत आहे. राजकीय नेतृत्त्वाने स्वतःचे स्वार्थापायी कुठल्या प्रकारचा पुरातन ठेवा असलेल्या हेमाडपंती मंदिरांना शासन प्रशासन व पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केला नाही त्यामुळे हे मंदिर अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे. गावचा कुठलाही विकास व्हावा व गाव प्रगतीच्या वाटेने जावे अशा प्रकारचा विचार राजकीय नेतृत्त्वाने केला नाही त्यामुळे एवढा मोठा इतिहासकालीन व हेमाडपंती ठेवा असलेला मात्र शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. राजकीय नेतृत्त्वाच्या हेव्यादाव्यांमुळे विकास खुटला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय नेतृत्त्वाने एकसंघ होऊन या हेमाडपंती व पुरातन कालीन मंदिरासाठी शासन दरबारी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.
 

दत्ता वाकसे
बीड जिल्हाप्रमुख धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत
मो. 8378982121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.