भाजपला मतं न देण्याचे धनगर समाजाचे आवाहन

महाराष्ट्र टुडे, ०१, फेब्रुवारी २०१९, अमरावती : राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षे उलटून गेली ; तरीसुद्धा धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याने समाजबांधवांनी या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये, असे आवाहन माजी मंत्री तसेच धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.


पंढरपूर ते माळशीरस असा मोर्चा काढणारे भाडोत्री आहेत, अशी टीकाही त्यांनी धनगर समाजातील इतर नेत्यांवर केली. धनगर समाज हा घटनेतच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट आहे. परंतु, राजकारण्यांनी सोईस्करपणे धनगर समाजाला डावलले. जे घटनेत आहे, त्यावर समिती काय करणार, असे डांगे म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचे पुन्हा गाजर देऊन धनगर समाजाचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.