पुन्हा.. लाॅकडाऊनची वेळ येऊ देऊ नका…

 उद्धव ठाकरे: करोनाच्या काळात मराठा समाजाने रस्त्यावर उतरू नये…
मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२०:
  करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, हे चित्र भितीदायक आहे. त्यामुळे नियम पाळा, लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.


करोनाचे सावट लक्षात घेता, मराठा समाजाने आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेवू नये, आम्ही त्यासाठी सकारात्मक आहोत, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी ठाकरे पुढे म्हणाले, न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती अनपेक्षित आहे. पण सरकार यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलने मोर्चा काढू नका असेही त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.