राजकीय नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली धनगर आरक्षण लढ्याची अखेर कधीच संपणार नाही, तेव्हा सामाजिक संघटनांनी सामुहिकपणे हा लढावा !

मराठा समाजातील सामाजिक  संघटना सतत आक्रमक राहून आंदोलन करत असतात त्याचा परिणाम सरकार घाबरुन निर्णय घेते, माञ त्यांचा निर्णय झाला की धनगर प्रतिक्रिया वादी बनून आमचे काय विचारतो....! म्हणजे ना मशागत ..ना पेरणी ..मग उगेल कसे?? तेव्हा सोशल मिडियात सुशिक्षित धनगर पुढे येऊन घरी बसल्या बसल्या आरक्षणाची हौस पुर्ण करण्यासाठी त्यांची चळवळी करण्याची ईच्छाशक्ती नसताना किंवा सोशलमिडियावर राञराञ जागून प्रतिक्रिया देणे यालाच चळवळ, आंदोलन असा गैरसमज करुन राजकीय नेत्यांवर टिका सुरु करतात......!


२०१४ ला जे आमदार व मंञी झाले  त्यावेळी त्यांनी आरक्षणाचा बारामतीचा लढा सुरु केलेला नव्हता तर तो लढा जनतेतुन सुरु होऊन बारामतीत जनतेनेच आंदोलन हातात घेतले होते. विशेषतः महादेव जानकर हे शेवटच्या क्षणी यात महायुतीच्या नेत्यांबरोबर एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून सामील झालेले होते. तसेच आंदोलन शिगेला पोहचले असताना उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत असताना मिडीयात समाजाची बाजू मांडण्यासाठी ते मिडीयात आलेले होते.  दुसरे असे की, समाजाच्या वतीने जे महायुतीकडून लिहुन घेतले त्यातही ते नव्हते म्हणजे ते एक राजकीय पक्ष म्हणूनच कार्यरत होते. राहीला प्रश्न मंञीपदाचा तर महायुतीचे घटक पक्ष म्हणून त्यांना सत्तेतील वाटा व तोही त्यांनी भाजपाशी भांडून सत्तेत आल्यानंतर एक वर्षाने एक राजकीय घटक पक्ष म्हणून मिळवले, तेव्हा काहीही चुकीचे लिहून समाजाची दिशाभुल केल्यामुळे समाजाला निगेटिव्ह करण्याची भुमिका चुकीची आहे. आपण स्वतः किमान  एक हजार  समाजबांधवांना एकञ आणून गेल्या ६ वर्षात एकही आंदोलन का केले नाही? जी जी मंडळी स्वतः ला धनगर समाजातील प्रसिद्ध लेखक व समाजसुधारक समजतात त्यांनी फक्त १००० माणसे एखाद्या आंदोलनात जमवून दाखवा मग समजेल. राजकारणी बनणे व तेही पक्ष चालवून तो जातीपुरता मर्यादित न ठेवता सर्वसमावेषक बनवणे उपेक्षित जातीतील माणसाला किती अवघड असते? आरक्षण लढा उभारुन  जर हे जमत नसेल तर इतरांवर बिनबुडाचे आरोप व तेही सतत करणे गैर आहे. 

तेव्हा मराठा समाजाचा लढा व धनगर समाजाचा लढा यातील मुलभुत फरक हाच आहे ते समाजातील व्यक्तिंंना दोष न देता पक्षांना देतात व त्यामुळे गटतट पडत नाहीत. त्यांनी राजकीय नेत्यांना पुढे केले नसल्यामुळे सामाजिक संघटनांनी आंदोलन चालवले त्यामुळे ते यशस्वी झाले. आपल्या समाजात बारामतीचा लढा हा एकमेव उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर ज्यांनी आयुष्यात कधीच चौंढी पाहीली नव्हती. ना कधीच आरक्षण मोर्चाला हजर राहीले नव्हते असे सुशिक्षित जमीनीवरचा लढा लढण्यापेक्षा सोशल मिडियाचा लढा लढत आहेत . त्यांना अजूनही आंदोलन व मेळावा यातील फरक कळला नाही. समाजाचा मेळावा हा नेता बनण्यासाठी घेतला जातो व आंदोलन हे  समाज स्वंयस्फुर्तीने रस्त्यावर अन्याया विरोधात उतरतो. या जगात आंदोलनानेच क्रांती होती तर मेळाव्याने समाज विशिष्ट व्यवस्थेचा गुलाम बनतो. बारामतीच्या आंदोलनाने सुशिक्षितांना सामाजिक कामाकडे आकृष्ट केले. 


परंतु सुसंस्कृत आंदोलनकर्ता नाही बनवले. ते बनण्यासाठी आरक्षण हा लढा जर आपण राजकीय नेत्यांच्या भरवशावर लढवला तर त्याची अखेर कधीच होणार नाही. दुसरे म्हणजे सरकार आमदार, खासदार व मंञ्यांना घाबरतात हा खुळा विचार सुशिक्षित नवलेखकांना आहे. जगात शासनकर्ते फक्त जनरेट्याला घाबरतात ! शरद पवार कुटुंब बारामतीचा जनरेटा पाहून त्या इतके त्यांच्या हयातीत कधीच घाबरले नव्हते! तेव्हा सोशलमिडियाचा उपयोग ना टिका करण्यासाठी वापरावा ना सरकारला धमक्या देण्यासाठी त्याचा उपयोग लोकांना आंदोलनात उत्सफुर्त पणे उतरण्यासाठी व आंदोलनाची दिशा शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी असावी. तसेच आंदोलनाचा शेवट कसा करायचा याची दिशादर्शक म्हणून असावा तरच धनगर आंदोलन यशस्वी होईल. आपण माञ सरकार मराठ्यांचा रेटा पाहून त्यांना नमले की आपण आमचे काय म्हणून प्रतिक्रियावादी बनतो. त्यापेक्षा लढा सामाजिक संघटनांना एकञित करुन सातत्याने लढा चालू ठेवल्यास सरकार आपोआप दखल घेऊन झुकते. मराठा समाजाला आरक्षणात घुसायचे व  ते घुसलेही. आम्हाला आमचेच मिळालेले घेता आलेले नाही तसे ते सरकारकडून नव्हे तर प्रशासनाकडून घ्यायचे होते हे आमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हाच आम्ही यशस्वी व सक्षम आंदोलनकर्ती जमात पर्यायाने राजकीय जमात बनलेले आसू.

सामाजिक संघटनांमुळे सामाजिक चळवळ उभी राहते. सामाजिक चळवळ उभी राहिली की जनमत तयार होते. जनमत तयार झाले की राजकीय चळवळीत रुपांतर होते.

बी.के. कोकरेसाहेब यांच्या सामाजिक चळवळीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. सामाजिक चळवळ ही अखंड पणे समाज प्रबोधन करत राहते. 

राज्यसभा वा विधानपरिषद कधीही भंग होत नाही तसे सामाजिक चळवळ ही कधीही भंग होता कामा नये. विचारधारा ही आपोआपच निर्माण होत जाते. 

बुद्धीवाद्यांनी हे काम हाती घ्यावे. तेव्हा महादेव जानकर यांनी ते अध्यक्ष असलेल्या यशवंत सेना या सामाजिक चळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात केल्यामुळे त्या  संघटनेचे काम थांबवले तेव्हा त्यांना सामाजिक नेता म्हनून न पाहता बहुजन समाजातील स्वतः चा  पक्ष असलेला राजकीय नेता म्हनूनच पहावे म्हणजे गैरसमज निर्माण होणार नाही.

मोहनराव जानकर पैठण, 

जि. औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.