करोनामध्ये सरकारने शाळा महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये - दत्ता वाकसे

बीड (प्रतिनिधी), ०९ जून, २०२०: सध्या संपूर्ण जगभर करोनाच्या महामारीचे संकट आहे त्यामध्ये सरकारने अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सिथिल केल्यामुळे अनेक ठिकाणी रुग्ण आढळुन येत आहे. तसेच अध्याप या वरती कुठल्याही प्रकारची लस देखील उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी कुठल्याही शाळा महाविद्यालये सुरु करण्याची घाई करू नये अशी, मागणी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन निघुन शकते. पंरतु जर शाळेय विध्यार्थ्यांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये तो विद्यार्थी दगावला तर ते खुप मोठे नुकसान होईल एक वर्षे विद्यार्थ्यांचे
शालेय नुकसान झाले तर ते पुढच्या वर्षी पुर्ण करता येईल पण करोनाच्या प्रादुर्भावमुळे त्या शालेय विद्यार्थी करोना बाधित झाले तर काय तेव्हा सरकारने जो पर्यत करोनावरती लस उपलब्ध होत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यत शाळा महाविद्यालये बंद ठेवावी. अनेक प्रगत देशाने शाळा महाविद्यालये सुरु करण्याचे निर्णय घेतले होते पंरतु ते करोनामध्ये सुरु ठेवणे शक्य झाले नाही त्यामुळे आपल्या देशातील देखिल शाळा, महाविद्यालये सध्या तरी सुरु करण्यात येऊ नये. केंद्रित मनुष्यबळ मंञी यांनी एका पञकार परिषदमध्ये सांगितले की १५ ऑगस्टनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात येईल पण त्या वेळची परिस्थिती बघुन सुरु केली तर काही वावग नाही. 
तरी पण जोपर्यत बाजारात लस उपलब्ध होत नाही. तोपर्यत असे निर्णय घेणे चुकिचे आहे असे नवले यांनी सांगितले आहे. सध्या सरकारने ज्या सेवा सुरु केल्या आहेत त्यामध्ये देखिल नागरिक हे कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टनचे पालन करताना दिसत नाही. सरकारने धार्मिक स्थळे उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो देखिल मागे घेण्यात यावा धार्मिक स्थळे उघडली तर त्या ठिकाणी गदीँ होणार आणि करोनाचा प्रादुर्भाव होणार हे सत्य आहे. त्यात सरकारने धार्मिक स्थळे उघडली तर, हि परिस्थिती आणखी अवघड होईल. बीडमध्ये चाकरवाडी, परळी वैद्यनाथ, हे धार्मिक स्थळे आहे. त्यामुळे हे देवस्थाने बंद ठेवण्यात यावे, या संदर्भात धनगर समाज संघर्ष समितीनि बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.