धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी वचननाम्याची होळी

दैनिक सामना, दि. ०३ डिसेंबर २०१८, परभणी : धनगर समाज संघर्ष समिती व समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या वचननाम्याची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल तीन महिन्यापूर्वी मिळाला. मात्र, याबाबत राज्यशासन कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे धनगर समाज संतप्त झाला आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर राज्य शासनाने धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव सोमवारी जिल्हाधिकारी परिसरात सकाळी 11 वाजता जमा झाले होते. त्यानंतर सरकारच्या वचननाम्याची होळी करण्यात आली.

2014 च्या निवडणुकीवेळी धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात युती सरकारच्या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आला होता. या जाहीरनाम्याची धनगर समाज बांधवांच्या वतीने होळी करण्यात आली. त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देऊन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड. हरिभाऊ शेळके, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, सुरेश भूमरे, अनंत बनसोडे, राजेश देवकते, भागवत बाजगीर, विजय घोरपडे, अशोक मुळे, संगिताताई जगाडे, सीताताई बालटकर, बालाजी वैद्य, लक्ष्मण लांडे, अर्जून ढेंबरे, नारायण घनवटे, प्रभाकर जगाडे, गंगाधर डुकरे, विष्णू बोरचाटे, कैलास खनपटे, बाळासाहेब ढोले, भारत आव्हाड, प्रसाद लेंगुळे, रामदास आबूज यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या आंदोलनास जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.