महाराष्ट्र सरकारने मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावेत- दत्ता वाकसे

बीड (प्रतिनिधी), दि. २३ जून, २०२०: महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये राहणारा समाज म्हणून नगरकडे पाहिले जाते, मेंढपाळ समाज म्हणून पाहिलं जातं. परंतु याच मेंढपाळांवर वेळोवेळी मोठ्या प्रमाणात हाल्ले होत आहे. त्यामुळे माननीय उद्धवजी ठाकरेसाहेब त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करणार आहे की, राज्यातील तमाम मेंढपाळ बांधवांना शस्त्र परवाने द्यावेत कारण या धनगर समाजाच्या मेंढपाळांवर वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एका गावामध्ये त्या
पुढे ते म्हणाले की, राज्यातील मेंढपाळ दऱ्याखोऱ्यामध्ये फिरतात त्यांना वन्य प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना अत्यावश्यक असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील तमाम मेंढपाळ बांधवांना शस्त्र परवाना देऊन त्यांना न्याय द्यावा असे देखील वाकसे यांनी म्हटले आहे.
ठिकाणच्या गावातील गुंडांनी त्या मेंढपाळांना शेतामध्ये मेंढ्या चारत असताना मारहाण केली. त्यामुळे त्या मेंढपाळाला रुग्णालयामध्ये दाखल केलेली असताना उपचारादरम्यान त्या मेंढपाळाचा मृत्यू झाला. राज्यातील तमाम मेंढपाळाच्या बांधवांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.